Friday, 30 August 2013

A New Issue.

Our next trial issue is coming soon... Just wait for only 1 DAY!!!

Wednesday, 28 August 2013

Wonderful nature...

1) Common Sergeant The Common Sergeant (Athyma perius) male has black wings with a series of white markings, while the female is a blackish brown. The underside of the wings are ochre yellow with the white markings as on the upperside but heavily margined and defined with black. The antennae are black and there is a spot of ochre between the eyes. The thorax has a band or two of bluish spots anteriorly and posteriorly. The abdomen is transversely and narrowly barred with bluish white; beneath, the palpi, thorax and abdomen pure white. In the female, the abdomen has a double lateral row of minute black dots.
2) Vine Sanke The green vine snake is diurnal and mildly venomous. The reptile normally feeds on frogs and lizard using its binocular vision to hunt. They are slow moving, relying on camouflaging as a vine in foliage. The snake expands its body when disturbed to show a black and white scale marking. Also, they may open their mouth in threat display and point their head in the direction of the perceived threat. There is a widespread myth in parts of southern India that the species uses its pointed head to blind its human victims.
The species is viviparous, giving birth to young that grow within the body of the mother, enclosed within the egg membrane. They may be capable of delayed fertilization (parthenogenesis is rare but not unknown in snakes) as a female in the London zoo kept in isolation from August, 1885 gave birth in August, 1888. The venom is mild and causes swelling. Symptoms will subside within three days
3) Indian Roller The Indian Roller (Coracias benghalensis), also called the Blue Jay in former times is a member of the roller family of birds. They are found widely across tropical Asia stretching from Iraq eastward across the Indian subcontinent to Indochina and are best known for the aerobatic displays of the male during the breeding season. They are very commonly seen perched along roadside trees and wires and are commonly seen in open grassland and scrub forest habitats. It is not migratory. but undertakes some seasonal movements. The largest populations of the species are within india, and Several states in India have chosen it as their state bird!

Panvel - Sarvesh Abhyankar
28/08/2013 Ramnarain Ruia College, Mumbai

Sunday, 25 August 2013

निसर्गातील सोबती ©

फुलपाखरू दिसायला सुंदर पकडायला तितकच कठीण 
हें common sailor नावाचं फुलपाखरू आहे मुंबई आणि त्याचा आजूबाजूच्या भागात सापडत. ओळखायला अगदी सोपं काळ्या रंगाच्या शरीरावर पांढरे रंगाचे ठिपके असतात. 
फुलपाखर नुसती फुलावर बसत नाहीत ते परागकण पण पसरवतात ज्याने नवीन झाडांची उत्पत्ती होते . झाड ही oxygen सारखा प्राणवायू देतात. म्हणजे हें दिसायला छोट आहे खर पण तितकच कामाच पण आहे. common sailor हें फुलपाखरू जास्त करून श्रीलंका',भारतम्यानमार इ. भागात 
Common Sailer
Indian Butterfly!
सहज सापडतो आपण सहजा अशा गोष्टीं कडे लक्ष देत नाही पण सध्या आपल्याला अस दिसून येत कि जसजसा आपल्याला पर्यावरणाच संवर्धन बद्दल जागरुकता निर्माण झाली आहे तसतसा आपण निसर्गाचा जवळ जात चलो आहोत. अशा फुलपाखरांचा  संवर्धन  करायला लागलो आहोत नुसता फुलपाखर नाही तर प्राणीपक्षीकीटक यांचा पण त्यात समावेश झाला आहे
निसर्गाचा आनंद हा त्याचाबरोबर राहण्यात आहे त्याला पूर्णतः संपण्यात नाही.

मुंबई                                                           - मानस बर्वे 
२५ ऑगस्ट २०१३                                   रामनारायण रुईया कॉलेज, माटुंगा,मुंबई


Blog code - B8
BL04
©Manas Barve
©Magazine World of UGI 2013

www,magazineindia.webs.com 

Saturday, 24 August 2013

Story - Nothing to Lose


Nothing to Lose

She’s alone at the last banquette, diagonally opposite to the bar and facing the dance floor.  My eyes have settled upon her since the past hour. She knows it. I guess she’s somewhere between thirty, thirty-five. That’s fine with me. She has had a bottle of red wine and I think she’s bit tipsy. She gets up and looks at me. My eyes follow her through the dancing crowd towards the smoke room. There’s a lovely butterfly engraved on the back side of her right shoulder.  I pull the last drag form the beer bottle and get up from the high leather stool at the bar. The pub is dimly lit.  The door to the smoke room is just little shy of being closed. I push it and thick tobacco smell hits my nostrils. Green neon lights dominate the interiors. The room is clouded with cigarette smoke. My eyes burn at first but soon I get adjusted to the atmosphere. My blurred eyes scan the room. She’s in the right corner, leaning on the wall with a smoke. There’s a couple on the couch. I sit on a leather stool opposite her and stick a cigarette between my lips.   
‘Light please?’ I ask her. She stares at me for a moment. The blank look on her beautiful face makes me weak in the knees. She puts her hand in her tiny purse and brings out her lighter. It’s a small square thing inscribed with some strange intricate design that my eyes can’t make out. Then she stoops ahead, her face at level to mine and just an inch away.  She lights my cigarette. The momentary bright glow on her face is unmistakable. She’s damn beautiful.  Her big raven black eyes are slightly lined with kajal. Partially hidden behind the flicks of her hair, they cast an enigmatic spell upon me.
‘Thanks.’
‘Don’t mind.’ She flicks the ash from her cigarette and smiles. She has an hourglass figure. Her black spaghetti skirt flaunts it perfectly. I take a deep puff and fix my eyes into hers. Neither she nor I budge for a minute or two. The music goes on and the cigarettes burn. Then a wicked grin lights up her face. She stoops ahead, much closer this time. I inhale the perfume on her neckline. ‘Join me for a drink,’ she whispers in my ears and walks out of the room. I crush the cigarette in the ashtray and follow her lead.
‘What would you like?’ she asks.
‘You.’
She giggles lightly with dimples in her cheeks. ‘I meant drinks.’
‘Really? In that case I’ll take Whiskey. JD neat.’
She nods her head and leans ahead with her hands folded on the bar floor at her breast level.
‘Yes ma’am?’ the bartender asks.
‘Vodka martini. Straight up. And one peg Jack Daniels for the gentleman. Serve it neat. Put the tab on me.’
We take a seat at her table. The waiter serves our drinks and leaves. She’s too seductive up so close. The music is loud. We both lean ahead, elbows on the table and our heads just couple of inches apart. There’s a ring in her left third finger.
‘You are married?’ I ask
‘Don’t you like married women?’  
‘I love them. I love adventures.’ Her smile broadens.
She raises her cocktail glass, ‘Cheers.’
‘Cheers.’ We both pull our first sips. I feel the familiar warmth in my throat.
‘How do you play it then? What are rules?’ she asks. Her big eyes never leave mine.
‘There are only two. Morals are for morons, wise men have affairs.’ I keep my glass down to make it bit dramatic, ‘The last and most important, always use protection.’ At this we both burst out laughing.
‘You are quite funny.’
 ‘What’s your name?’ I ask
‘Can be anything. Choose your pick.’
Smart girl. ‘Disha. You like it?’
‘Is that the last woman you slept with?’ She grins.
‘Nah. It’s just a name hidden somewhere in the back of my mind.’ I take another sip and look away.
‘Oh! We got a love story here huh.’
‘There’s always a love story, isn’t it?’   
‘No. Love stories are for morons. Wise women have rich men.’ She blinks an eye with a wicked half smile. We both can’t hold back laughing aloud.
‘You are quite clever.’ I look into her eyes with my perfect poker face, pick up my rock glass and give a slight jerk to my drink, ‘Bottoms up.’ She raises her cocktail glass and nods slightly. We both drain our glasses down our throats.
‘And the stakes of the game?’ she asks
‘You and I, we both know people like us have nothing to lose.’
She doesn’t say a word, just smiles. We both stare at each other for a moment.
‘Two zero three.’ She gets up; her big eyes still bore into mine. ‘Make it fast.’ She turns on her heels and vanishes in the crowd.
 
I knock on the door. A moment later she opens it with a twinkle of joy on her face. I enter the luxury suit, hold her by the waist and pull her close. Her hair is wet and fragrant. I put my hand behind her neck into her wet hair. She bit my lower lip and her hands rub my chest in my shirt. She takes my hand and leads me to the bedroom. She pushes me down on the bed and gets upon me. Her deep black eyes have raw passion. We both fight for dominance, kissing, biting and discovering each other…
I wake up with a slight headache. She’s not beside me. I didn’t expect her to be. I take a shower and dress up. I find a folded piece of paper on the table beside my watch. I open it. It reads- ‘Thanks for the great time.’  I put it on the table, pick up my watch and leave the suit.



 Mulund, Mumbai                                                                                                      - Onkar Surve
24/08/2013                                                                                               College Name :- --- N.A.-----              


Friday, 23 August 2013

कोलेस्टरॉल

मानवी आरोग्य जर सुदृढ असेल तर त्याचे जीवन देखील सुखमय होते! आज आपण याचीच चर्चा करूया!
रक्तातील कोलेस्टरॉलचे प्रमाण ठराविक मर्यादेपेक्षा वाढल्यास हृदयविकार वा हृदयाशी संलग्न अशा रोगांचा धोका संभवतो. हे प्रमाण वाढण्याची कारणे अनेक असू शकतात. त्यातील अनेक कारणे आपल्या जीवनशैलीशी संबंधित आहेत. 
कोलेस्टरॉल हा शब्द ऐकला की सगळ्यांचे कान टवकारतात. हृदयविकाराशी असलेला त्याचा संबंध हे त्यामागचे प्रमुख कारण. रासायनिकदृष्ट्या कोलेस्टरॉल हे मेद आहे. हातात घेतल्यास ते मेणासारखे वाटेल. त्याचा रंगही मेणासारखा पिवळट पांढरा असतो. कोलेस्टरॉल शरीरात रक्ताच्या माध्यमातून फिरत असते. मेद असल्यामुळे ते रक्तात विरघळत नाही; पण त्याचा शरीरात मुक्त संचार आवश्यक असतो. त्यामुळे कोलेस्टरॉलचे रेणू मेदप्रथिनांच्या मोळीत बांधले जातात. 
ही मोळी रक्ताशी एकजीव होते व मेदप्रथिनयुक्त कोलेस्टरॉल त्याच्या इष्टस्थळी पोहोचविले जाते. या मोळीला शास्त्रीय परिभाषेत ‘अपोलिपो प्रोटीन्स’ असे संबोधतात. यात कोलेस्टरॉलसोबतच ट्रायग्लिसराइड्स, फॉस्फोलिपीड व प्रथिन हे घटक एकत्रित केले जातात. यातील ट्रायग्लिसराइड्स म्हणजे तीन मेदाम्लांचे रेणू व ग्लिसरॉल यांचे संयुग. या ट्रायग्लिसराइड्सचा शरीराला उर्जास्त्रोत म्हणून उपयोग होतो. पण आहारात यांचे प्रमाण अधिक असल्यास त्याचे अनिष्ट परिणाम रोहिणी या शुद्ध रक्तवाहिन्यांना,व पर्यायाने हृदयाला भोगावे लागतात.
उच्च घनतेच्या मेदघटकांत (एच.डी.एल.) प्रथिने अधिक प्रमाणात असतात, तर मेदांचे प्रमाण कमी असते. कमी घनतेच्या मेदघटकात (एल.डी.एल.) प्रथिन कमी प्रमाणात, व मेद अधिक प्रमाणात असतात. यकृतात तयार होणाऱ्या कोलेस्टरॉलची शरीरातील पेशींमध्ये ने-आण कमी घनतेच्या मेदघटकाद्वारे केली जाते. या कमी घनतेच्या मेदघटकांचे रक्तातील प्रमाण वाढल्यास कोलेस्टरॉल रोहिणीमध्ये साचू लागते व त्यातून हृदयरोग होण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच या कमी घनतेच्या मेदघटकातील कोलेस्टरॉलला ‘वाईट किंवा हानिकारक कोलेस्टरॉल’ संबोधतात. 
रक्तात त्याचे योग्य प्रमाण राखणे आपल्या हाती असते. आहारात मेदयुक्त घटकांचे प्रमाण नियंत्रित ठेवल्यास त्याचा फायदा होतो. उच्च घनतेच्या मेदघटकांत प्रथिनांचे प्रमाण अधिक असते. या घटकाचे कार्य कोलेस्टरॉलची ने-आण करणे नसून शरीरात ठिकठिकाणचे जास्तीचे कोलेस्टरॉल गोळा करणे हे असते. गोळा केलेले सर्व कोलेस्टरॉल या घटकाद्वारे यकृताकडे सुपूर्द केले जाते. तेथे शरीराच्या आवश्यकतेनुसार त्याचे रिसायक्लेशन तरी होते किंवा विघटन घडवून आणले जाते. रक्तातील या उच्च घनतेच्या मेदघटकांचे अधिक प्रमाण म्हणूनच हृदयाच्या दृष्टीने चांगले वा हितकारक समजले जाते. या प्रकारच्या मेदप्रथिनांत ऑक्सिडेशनविरोधी तत्वे असतात. नियमित व्यायामामुळे उच्च घनतेच्या मेदप्रथिनांचे प्रमाण रक्तामध्ये अधिक राखले जाते, तर धूम्रपान व लट्ठपणामुळे ते कमी होते. आहारात मेदाचे प्रमाण अधिक असल्यास उच्च व कमी घनतेच्या मेदप्रथिनांचे प्रमाण रक्तामध्ये अधिक असते. आहारातील मेदाचे प्रमाण कमी केल्यास दोन्ही मेदप्रथिनांचे प्रमाण कमी होते. त्यामुळेच चौरस आहार महत्त्वाचा ठरतो.
कोलेस्टरॉलची शरीराला अनिवार्य गरज असल्याने त्यासाठी फक्त बाहेरच्या रसदीवर अवलंबून रहावे लागू नये, अशी योजना निसर्गाने केली आहे. ते शरीरातच यकृतात बनविले जाते. आपण कोलेस्टरॉलरहित आहार स्वीकारला तरीही आपल्या शरीरात रोज एक ग्रॅम कोलेस्टरॉलचे उत्पादन होतच असते. या उत्पादनावर आपल्या शरीराचे संपूर्ण नियंत्रण असते. फ्रीजमध्ये जसे तापमानावर नियंत्रण ठेवले जाते, तसाच काहीसा हा प्रकार. 
फ्रीजमधील तापमान विशिष्ट बिंदूच्या खाली गेले की त्यातील तापनियंत्रक सक्रिय होतो व काँप्रेसरला होणारा विजेचा प्रवाह खंडित करतो. तापमान त्या बिंदूच्या वर गेले की नियंत्रकाद्वारे पुन्हा प्रवाह सुरु केला जातो. तसाच प्रकार कोलेस्टरॉलबाबत होतो. पेशींमधील कोलेस्टरॉल ठराविक मर्यादेच्या खाली गेले की ते एका विशिष्ट प्रथिनाच्या लक्षात येते व ते प्रथिन पेशीमधील जनुकांपैकी कोलेस्टरॉल निर्मितीस जबाबदार असलेल्या जनुकपुंजास उद्दीपित करते व तत्काळ कोलेस्टरॉलच्या उत्पादनास सुरुवात होते.
रक्तातील कोलेस्टरॉलचे प्रमाण ठराविक मर्यादेपेक्षा वाढल्यास हृदयविकार वा हृदयाशी संलग्न अशा रोगांचा धोका संभवतो. हे प्रमाण वाढण्याची कारणे अनेक असू शकतात; पण मुख्य कारणांमध्ये मदिरापान,धूम्रपान, बैठे काम, व्यायामाचा अभाव व बाजारी झटपट खाऊ नेहमी नेहमी खाणे यांचा समावेश होतो. गाड्यांवर किंवा हॉटेलात मिळणारे वडे, समोसे, भजी असे तळलेले पदार्थ म्हणजे अधिक कोलेस्टरॉल हे समीकरणच आहे. 
वारंवार गरम व थंड होणाऱ्या कढईत स्वयंपाकी आहे त्याच तेलात नव्याने तेल ओतत असतात तेव्हा त्या तेलातील असमृक्त मेदाम्लांचे रुपांतर संपृक्त मेदाम्लांमध्ये होत असते व त्याचा अनिष्ट परिणाम वाढलेल्या कोलेस्टरॉलच्या व ट्रायग्लिसराइड्सच्या रुपात दिसून येतात. त्यातूनच हृदयविकार उद्भवतात. जे शरीर आपल्यासाठी अमूल्य असे आहे त्याची काळजी घेणे आपले आद्य कर्तव्य आहे, ह सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवे.
हृदयविकार टाळण्यासाठी...
> आहारात फळे व भाज्यांचा वापर वाढविणे.
> कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा. नुसते उपास करून किंवा कोलेस्टरॉल विरहीत जेवण करून कार्यभाग साधणार नाही, हे जरूर लक्षात ठेवावे.
> व्यायाम नियमितपणे व पुरेसा करणे महत्वाचे आहे.
> नियमितपणे ठराविक तास झोप अत्यंत महत्त्वाची आहे.
> झटपट बाजारी खाऊ टाळावा. पावभाजी, वडे, समोसे कधीतरी सटीसहामासी ठीक; पण ती लक्ष्मणरेषा ओलांडू नये!
> शरीराचे वजन नियंत्रणात ठेवावे
> धूम्रपान, मदिरापान व इतर अंमली पदार्थांपासून कटाक्षाने दूर राहाणे आपल्याच हाती आहे, ते निष्ठेने केले पाहिजे.
म्हणूनच तर म्हणतात ना.. आरोग्यं धनसंपदा !!
आपणास देखील निरोगी आयुष्य लाभो हीच प्रार्थना!

मुंबई                                                                                                                       - अनामिक 
२३ ऑगस्ट २०१३                                                                                  

( सदर ब्लॉग सुहास पाडगावकर, रा.विलेपार्ले , मुंबई यांनी पाठवलेल्या ई-मेल मधून साभार घेण्यात आला आहे! या ब्लॉग करिता Magazine World of UGI वा Magazine World of UGI चा कोणताही संबंधित कोणत्याही आणि कसल्याही प्रकारे जबाबदार असणार नाही!)

Thursday, 22 August 2013

कवितांचा ब्लॉग!!

कवितांचा ब्लॉग!!

आजवरी कधी ना पाहीला विठ्ठल ,
तरी त्याचे ध्यान कैसे लागे ?
कधी ना पाहीले भक्तीसरोवर,
अमृताची गोडी कैसी लागे ||
म्हणे पांडुरंग देवांचा तो देव,
दर्शनाची तृष्णा कैसी भागे ?
तन मन झाले ठायी त्याचे लीन,
अभंगाचे स्नान चंद्रभागे ||

-तुषार दिवेकर आणि सतीश तांदळे 
विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर 
Satish Tandle
Ambewadi, Karveer, Kolhapur
Tushar Divekar
Kolhapur











                                                                                                                                                                                                                                                                                                                        
kavita mi shodhat aahe!
Mayuresh Adhikari

सांजवेळी अवतीभवती पाखरांसंगे फिरत आहे ..
पंखात माझ्या बळ येऊनही कविता मी शोधत आहे..

                    शब्द इतुके मोजून घेता,
                    स्फुरले मजला कसे बसे ,
                     मांडता हा फसला डाव ,
                     अन रचता रचता होत हसे!!
खाडाखोड होऊन इतुकी शाईसुद्धा संपत आहे...
पंखात माझ्या बळ येऊनही कविता मी शोधत  आहे..

                   सुचून सुचून खोल विचारात ,
                   डोक्यालाही येई खाज ..
                   सुचलेले हे लिहून पाहता ,
                   येते मजला माझी लाज.. 
विचारानाही विचारताना एकच गोंधळ उडत आहे..
पंखात माझ्या बळ येऊनही कविता मी शोधत  आहे..

                     एवढे लिहून अर्थाविण 
                     अर्थही त्यास उरतो काय ?
                    जशी वाटते खिन्न नासकी ,
                     केविलवाणी दुधी साय ..
पान पान हे लिहून कागद कोरा मजला भासत आहे..
पंखात माझ्या बळ येऊनही कविता मी शोधत आहे ..

                     भावना या जाऊन दडल्या ,
                     प्रत्येक शब्दा मागोमाग ..
                    जरा कुठे त्यास हिणविता ,
                    येतो त्यांना एकच राग..!!
हातात लेखणी थेट सरळ ही पानासंगे बोलत आहे..
पंखात माझा बळ येऊनही कविता मी शोधत आहे..

                   कविता ही तशीच आहे ,
                ताज्या त्या दवबिंदुपरी..
                    पानांवरची पुसत अक्षरे ..
                     जुनाट का ती;  असतील जरी..
           कोणीच नव्हते कधीच केव्हा, पण कविता ती सोबत आहे..
        पंखात माझ्या बळ येऊनही कविता मी शोधत आहे.. 

**********
उजाडलेले आभाळ मी चांदण्यात पाहिले  होते..
माझेच डोळे मी तुझ्यात पाहिले  होते..

गारव्यात ही प्रीत झुळूक ती तशीच थरथरणारी 
त्या मंद हवेत तुला माझ्या कवेत पाहिले होते..

मेघात अडकला चंद्र शुभ्र, पाण्यात स्वार तो मुक्त  
त्या सफेद पांढऱ्या गोळ्यात मी तुलाच पाहिले होते..


कुजबूज कानी पडती, सांगण्यास ओठ हे झुकती ..
त्या कानाजवळ मी हात तुझेच पाहिले होते..


निवास - कळवा , ठाणे                                                                                         -मयुरेश अधिकारी 

२२ ऑगस्ट २०१३                                                                                        रामनारायण रुईया कॉलेज,मुंबई 

Tuesday, 20 August 2013

दु:खद मनाचा ब्लॉग

आज खरे तर संपूर्ण महाराष्ट्र नारळी पौर्णिमेची आणि रक्षाबंधनाची धूम साजरी करत असताना अचानकपणे घडलेल्या दोन दुर्दैवी घटनांमुळे दुःखाच्या खाईत लोटला गेला. सामाजिक चळवळीचा पुरोगामी आवाज असणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची आज पुण्यात निर्घुण हत्या करण्यात आली. तर माहीम, मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांचे आजारपणामुळे दुखद निधन झाले.
नरेंद्र दाभोळकर हे महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळी मधील अग्रणी होते. अभ्यासू , विचारी, अंधारातून प्रकाशवाटेकडे नेणारे आणि नवचेतना रुजवणारे हे व्यक्तीमत्व , तर दुसरीकडे अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणारा धर्मपंडित हरपतो यासारखा क्लेशदायी दिवस असूच शकत नाही. यासाठीच आपल्यातील या दोन हरपलेल्या great personality  ना आणि त्यांच्या मृतात्म्यांना चिरशांती लाभो हीच प्रार्थना!
या करिता हा खास ब्लॉग !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये एक फेब्रुवारी १९२९ रोजी जन्मलेल्या जयंत शिवराम साळगांवकर यांनी ज्योतिष, पंचांग आणि धर्मशास्त्र या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. मॅट्रिकपर्यंत संस्कृतचे परंपरागत शिक्षण घेतलेल्या साळगांवकरांनी पंचांग आणि दिनदर्शिका यांचा उत्तम मेळ घालून कालनिर्णय हा नऊ भाषांतून प्रसिद्ध होणारा एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचा ब्रँड निर्माण केला. घराघरात भिंतीवर दिनचर्येचे वेध घेणारी  'कालनिर्णय' या दिनदर्शिकेचे जयंत साळगांवकर हे जनक आणि संपादक होते. 'कालनिर्णय' ला इतकी लोकप्रियता मिळाली की मूळात ही बारा पानांची दिनचर्या 'दिनदर्शिका' या नावाऐवजी 'कालनिर्णय' शब्दाने संबोधली जाऊ लागली होती. केवळ महाराष्ट्रात सिमीत न राहता,  साळगावंकरांनी  तब्बल नऊ भाषांतून 'कालनिर्णय' दिनदर्शिका प्रकाशित केली. 'कालनिर्णय' या दिनदर्शिकेची उलाढालही कोटींच्या घरात होती. दिनदर्शिकेत धार्मिक आधुनिकता असावी याकडे त्यांचा नेहमी कल असे.  या आधुनिकतेचे प्रतिक म्हणजे 'कालनिर्णय'ची अमेरिकन प्रत काढून त्यांनी अमेरिकेतही 'कालनिर्णय'ला पोहचविले.
त्याचबरोबर दैनिक वृत्तपत्रातून राशीभविष्य आणि शब्दकोडे वाचकांना उपलब्ध करून देण्याची संकल्पनाही जयंत साळगांवकरांचीच. दिवसभराच्या घडामोडींचा वेध घेणाऱया वृत्तपत्रात शब्दकोडे सुरू करून ते लोकप्रियही ठरू शकते  हे साळगावंकरांनी सिद्ध केले. त्यानुसार शब्दकोड्यांना इतकी लोकप्रियता मिळाली की आजही प्रत्येक वृत्तपत्रात दैनिक राशीभविष्य आणि शब्दकोडे यांना जागा आहे.
Jyotirbhaskar Jayant Salgaonkar
Founder - Kalnirnay pariwar


आज एकट्या मराठी भाषेत कालनिर्णय दिनदर्शिकेचा (कॅलेंडर) खप ४८ लाखांपेक्षा जास्त आहे. ही दिनदर्शिका १९७३ पासून प्रसिद्ध होत आहे.

कालनिर्णयचे संस्थापक-संपादक असलेल्या जयंतरावांनी ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्राविषयी विपुल लेखन करुन लोकांच्या मनातील गैरसमजुती आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणा-या विविध संस्थांच्या कार्यात ते उत्साहाने सहभागी होत होते.

सार्वजनिक क्षेत्र

श्री सिद्धिविनायक मंदिर , मुंबई ह्या संस्थेचे माजी ट्रस्टी.

आयुर्विद्यावर्धिनी ह्या आयुर्वेदिक संशोधन करणाऱ्या ट्रस्टचे माजी अध्यक्ष.

मुंबई मराठी साहित्य संघ ह्या संस्थेचे अध्यक्ष.

श्रीगणेश महानिधी ह्या पत्रकारिता , सैनिकी शिक्षण आणि रंगभूमी ह्या क्षेत्रांत महत्त्वाचे काम करणाऱ्या ट्रस्टचे संस्थापक , अध्यक्ष.

श्रीगणेश विद्यानिधी (पुणे) ह्या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या ट्रस्टचे अध्यक्ष.

महाराष्ट्र गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष.

इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष.

दादर-माटुंगा कल्चरल सेंटर संस्थेचे विश्वस्त.

महाराष्ट्र व्यापारी मित्रमंडळाचे अध्यक्ष.

१९८३ अखिल भारतीय ज्योतिष संमेलनाचे अध्यक्ष.

मुंबई येथे झालेल्या ७४ व्या नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष.

सातारा जिह्यातील विटा येथे झालेल्य विसाव्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान , आळंदी यांनी बांधलेल्या श्रीज्ञानेश्वर मंदिराचे सन्माननीय उद्घाटक.

कोल्हापूर येथे २९-३० एप्रिल इ.स. १९९१ रोजी झालेल्या आठव्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष होते.

मुंबईत झालेल्या अखिल महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे स्वागताध्यक्ष.

श्रीसमर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या विद्यमाने आणि गुरुकुल प्रतिष्ठान पुणे यांच्या सहकार्याने सातारा येथे झालेल्या संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.

आणखी कितीतरी ट्रस्टवर आणि सेवाभावी सार्वजनिक संस्थात पदाधिकारी.

लेखन

' सुंदरमठ ' ( समर्थ रामदासस्वामींच्या जीवनावरील कादंबरी)

' देवा तूचि गणेशु ' ( श्रीगणेश ह्या दैवताचा इतिहास आणि स्वरुप , तसेच समाजजीवनावरील त्याचा प्रभाव याचा अभ्यासपूर्ण आढावा).

' धर्म-शास्त्रीय निर्णय ' ह्या ग्रंथाचे संपादन व लेखन

आतापर्यंत विविध सामाजिक , ऐतिहासिक , धार्मिक विषयावर दोन हजारांहून अधिक लेख प्रसिद्ध.

' कालनिर्णय ' या नऊ भाषेतून निघणा-या वार्षिक नियतकालिकाचे (कॅलेंडरचे) संस्थापक-संपादक.

' पंचांग ' ह्या क्षेत्रांत सुलभता आणि शात्रशुद्धता आणण्याचे यशस्वी प्रयत्न. पंचांगाचा परंपरागत साचा बदलून नवीन स्वरूपात पंचांगाचे संपादन.

महाराष्ट्र टाइम्सच्या (ऑनलाइन आवृत्ती) ' प्रातःस्मरण ' या सदरात जानेवारी २००९ पासून प्रत्येक मंगळवारी प्रसिद्ध झालेले लेख

' सगुण-निर्गुण दोन्ही समान ' ( महाराष्ट्र टाइम्समध्ये ' सगुण-निर्गुण ' या सदरातून २००३-२००६ दरम्यान प्रसिद्ध झालेल्या ११६ लेखांचा (संदर्भ टीपांसह) संग्रह)

' देवाचिये द्वारी ' ( धार्मिक , पारमार्थिक अशा स्वरुपाचे लिखाण संतवाङमयाच्या आधाराने १९९५ मध्ये लोकसत्तात प्रकाशित झालेल्या ३०९ लेखांचा संग्रह).

' सुंदर ते ध्यान ' ( देवाचिये द्वारी भाग-२) (१९९६ मध्ये दैनिक लोकसत्तात ' देवाचिये द्वारी ' ह्या सदरात प्रसिद्ध झालेल्या ३११ लेखांचा संग्रह).

' अमृताची खाणी ' ( देवाचिये द्वारी भाग-३) (१९९७ मध्ये दैनिक लोकसत्तात ' देवाचिये द्वारी ' ह्या सदरात प्रसिद्ध झालेल्या ३१३ लेखांचा संग्रह).

' आनंदाचा कंद ' ( देवाचिये द्वारी भाग-४) (१९९८ मध्ये दैनिक लोकसत्तात ' देवाचिये द्वारी ' ह्या सदरात प्रसिद्ध झालेल्या ३१३ लेखांचा संग्रह).

' ज्ञानाचा उद्गार ' ( देवाचिये द्वारी भाग- ५) (१९९९ मध्ये दैनिक लोकसत्तात ' देवाचिये द्वारी ' ह्या सदरात प्रसिद्ध झालेल्या ३१३ लेखांचा संग्रह).

' दूर्वाक्षरांची जुडी ' (' देवाचिये द्वारी ' १९९५-१९९९ मधील श्रीगणेशावरील लेखांचे संकलन)

' गणाधीश जो ईश ' ( श्रीगणेशावरील लेख व मुलाखती. वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या लेखांचा संग्रह)

' रस्त्यावरचे दिवे ' ( आयुष्यात घडलेल्या , अनुभवाला आलेल्या , तसेच कोणाकडून तरी समजलेल्या प्रत्यक्ष घटनांवर आधारित साप्ताहिक ' रविवारचा सकाळ ' मध्ये प्रकाशित झालेल्या लेखांचा संग्रह)

' भाव तोचि भगवंत ' ( दैनिक सकाळ मध्ये ' देवाचिये द्वारी ' ह्या सदरात २००५-२००६ ह्या दरम्यान प्रसिद्ध झालेल्या १०८ लेखांचा संग्रह)

पुरस्कार आणि गौरव

ज्योतिर्भास्कर(संकेश्वर पीठाच्या शंकराचार्यांनी परीक्षा घेऊन दिलेली पदवी).

ज्योतिषालंकार (मुंबईच्या ज्योतिर्विद्यालयातर्फे दिलेली सन्मानदर्शक पदवी).

ज्योतिमार्तंड (पुण्याच्या ज्योतिष संमेलनात दिलेली सन्मानदर्शक पदवी).

महाराष्ट्र ज्योतिष विद्यापीठाने दिलेली विद्यावाचस्पती (डी.लिट्) ही बहुमानाची पदवी.

नाशिकच्या पुण्यश्लोक सद्गुरूच्या शिवपार्वती प्रतिष्ठानतर्फे ' वैदिक पुरस्कार ' देऊन गौरव.

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे उत्कृष्ट सदर लेखनाबद्दल ' भ्रमंती पुरस्कार '.

कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे ' जीवनगौरव पुरस्कार '.

छत्रपती शिवाजीमहाराज स्मारक समिती , मुंबई तर्फे ' जीवनगौरव पुरस्कार '.

महाराष्ट्र कला निकेतन तर्फे सांस्कृतिक कार्यासाठी ' महाराष्ट्र रत्न ' पुरस्कार.

कृष्णमूर्ती ज्योतिष संशोधन मंडळ , मुंबई तर्फे ज्योतिष शास्त्राच्या विशेष सेवेप्रीत्यर्थ ' ज्योतिक कौस्तुभ ' पुरस्कार.

श्री समर्थ सेवा मंडळ , सज्जनगड , सातारा यांच्यातर्फे ' समर्थ संत सेवा पुरस्कार '

रा.स्व.संघ जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत) , पुणे यांच्या वतीने धर्मसंस्कृती क्षेत्रातील " परम पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार २०१०

ज्योतिर्भास्कर साळगावकरांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघू शकणार नाही! यांच्या निधनानंतर अवघ्या काहीच वेळात पुण्यनगरीमध्ये एका समाजसेवा पर्वाचा निर्घुण अंत झाला!
तर,
मराठी बुद्धिवादी, सामाजिक कार्यकर्ते अशी ​डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची ओळख. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी इ.स. १९८९ साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना स्थापली.
Dr. Narendra Dabholkar
Editor, Sadhna & Founder,ANS

जीवन

डॉ. नरेंद्र दाभोलकर हे त्यांच्या दहा भावंडांपैकी सर्वात धाकटे होय. सुप्रसिद्ध समाजचिंतक कै. डॉ. देवदत्त दाभोळकर हे त्यांचे सर्वात थोरले बंधू होते.

शिक्षण

नरेंद्र दाभोलकरांचे माध्यमिक शिक्षण साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत झाले. त्यांनी सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयातून विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शिक्षण व इ.स. १९७० साली मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शाखेचे उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी सातारा यथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.

सामाजिक कार्य

बाबा आढाव यांच्या "एक गाव- एक विहीर" या चळवळीत नरेंद्र दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्यांनी श्याम मानव यांच्या इ.स. १९८३ साली स्थापन झालेल्या "अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन संमिती"मध्ये कार्य सुरू केले. पण नंतर इ.स. १९८९ मध्ये त्यापासून वेगळे होऊन त्यांनी "महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती" स्थापन केली. साने गुरुजींनी स्थापन केलेल्या "साधना" या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते डिसेंबर २००६पासून संपादक होते.

साहित्य

अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम -राजहंस प्रकाशन

अंधश्रद्धा विनाशाय -राजहंस प्रकाशन

ऐसे कैसे झाले भोंदू -मनोविकास प्रकाशन

झपाटले ते जाणतेपण -संपादक नरेंद्र दाभोळकर व विनोद शिरसाठ.

ठरलं... डोळस व्हायचंय -मनोविकास प्रकाशन

तिमिरातुनी तेजाकडे -राजहंस प्रकाशन

प्रश्न मनाचे (सहलेखक डॉ हमीद दाभोलकर)-राजहंस प्रकाशन

भ्रम आणि निरास -राजहंस प्रकाशन

विचार तर कराल? -राजहंस प्रकाशन

विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी -दिलीपराज प्रकाशन

श्रद्धा-अंधश्रद्धा - राजहंस प्रकाशन (इ.स. २००२)

असे हे दाभोळकर! या उभयतांना सारा महाराष्ट्रच नव्हे तर हा भारत सदोदित स्मरणात ठेवेल. चळवळीचे सामर्थ्य बाळगणाऱ्या प्रत्येक भारतीयाच्या मनात आदर,अभिमान आणि अनाम समाजकार्याची गोडी अधिकच निर्माण होईल. जरी प्रत्यक्ष आपल्यात नसले तरी दाभोलकर यांची चळवळ उद्याचा प्रगत विज्ञानवादी समाज नक्कीच घडवेल तर, साळगावकरांनी दिलेला अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालणारा मार्ग भारताच्या आगामी प्रवासासाठी अधिकच प्रशस्त होईल यात य:किंचित शंका वाटत नाही!

जय हिंद! सदा सर्वं राष्ट्रं सेवामहे!



मुंबई                                                                      शुभंकर करंडे *
२० ऑगस्ट २०१३                                         रामनारायण रुईया कॉलेज, मुंबई

विशेष आभार :

महाराष्ट्र टाईम्स
लोकसत्ता
ibn लोकमत
abp माझा


Writer of this blog is a Founder & Head managing director of Magazine World of UGI*



Monday, 19 August 2013

Sports Culture in India

Sports culture in India- India is a land with diverse culture. It is therefore said that “UNITY IN DIVERSITY”. Sports culture in India can be traced long back as pre-British era,or even to the vedic age sports but some kind of games/ sports  were known to them. Games played in ancient  India were boat race,dhopkhel,asal aap(canoe race of Nicobar people), kabbadi, kho kho ,mallkhamb,kirip(popular kind of wrestling amoung nicobars tribe) ,mukna (combination of wrestling and judo originated in Manipur),archery played in Manipur goes back to year 3100 b.c., martial arts is one of the sport form  as art form which includes fighting equipment that comprises a sword and shield, now modified into a stick encased in soft leather and a shield made of leather. These games and sports are still relevant and popular in India but has not got enough recognition at national and international level,though kabbadi and some other games have gained immune importance after its tremendous show in recent world cup of kabbadi. Every state or region has its own different game and is been played it  in its own style according to individual or group, indoor or outdoor , most of the games played are outdoor  only.
        The most popular sports that people follows play and are passionate about the sport are cricket which is immensely popular in India and people of all age group are influenced by it and follow it. After cricket, football, badminton , lawn-tennis, hockey,etc is been quite popular among the youth and kids.
       Though hockey is national game/sport of India , it is cricket which has joined more popularity as cricket was introduced  by British but Indians gained great success and achieved great heights while playing cricket in international arena. Cricket is been played in every part of our country at various lovely and there is a popular saying in cricket as ‘cricket is my religion and Sachin is my god’. Therefore we can say cricket is the most widely spread game across are country. But we should not focus only on cricket as we Indians are proud of our national game as well as other ancient games that originated in India. Hockey was at its peak when major dhyanchand won consecutive gold medals for India at Olympic. There are many other sports apart from cricket hockey are known to us and played by people in different parts of the country.
      Sports culture in India as we can see that there are various of sports and games playing in India of which we should be proud about.
       Sports culture of India is not very rich but is quite good and the excellence of players and teams in different sports is very good and is developing. Sports in India especially in metropolitan cities like Mumbai,Delhi, Banglore, Kolkata,Chennai is seen from a border perspective and the infrastructure facility provided here are superior than other parts of our country.
       Players from various part of country come and take part in boxing , wrestling , judo, athletics etc but the facilities provided to them are not so good therefore these is dire need for development  in the infrastructure facilities and the facilities provided to the players take part in this game. But due to inefficiency of facility players are not willing to participate in these games to some these games it is the duty of government, corporate sector and even the association of sports to save the deteriorating culture of sports in India
       There is one more reason deteriorating culture of sports that is invention of modern technology so people rather play on tablet, p.c, Android etc rather than going outside and playing. Though passionate people go and show their talent an skills
       Therefore we can see that sports culture in India has seen a lot of transition and development forum one period to another period and there are verity of sports which are played in India which has a lot of value for the public.
        So we can say to improve the sports culture of India , it is the responsibility of SAI. Sports ministry to improve and raise the standard of games and sports and provide the best of facility to players ,teams and coach as well ..
Kalyan, Thane                                                                                                        Siddhant Sinha
19th August, 2013                                                                                    Ramnarain Ruia College, Mumbai




Saturday, 17 August 2013

संस्कृती Culture!!

निसर्ग ! एक चमत्कार !किती बुद्धिवान कलावंत आहे हा! नाजूक हृदय , त्याला बरगड्यांच्या पिंजऱ्यात सुरक्षित ठेवलं . शरीराचा राजा मेंदू! त्याला डोक्याच्या कवटीमध्ये आढळ स्थान दिलं... अशाच या निसर्गाने एक एक शृंखला जोडून एके एक व्यवस्था निर्माण केली आणि तिचा चलन वलन नीट व्हावं म्हणून त्या श्रुन्खलेभोवती संस्कृतीचा रेशमी गोफ विणला!
भूक लागल्यावर जेवणे ही प्रकृती, पण आपल्या घासातला घास  दुसऱ्याला देणे ही संस्कृती! हृदय आणि बुद्धी यांची पूजा करणारी संस्कृती. संस्कृती म्हणजे सहानुभूती , विशालता , सत्याचे प्रयोग,स्थाणू न राहता ज्ञानाचा मागोवा घेत पुढे जाणे, संस्कृती म्हणजे गरज! जगात जे काही सत्य , शिव आणि सुंदर आहे ते सारे संस्कृती मध्ये येते! संस्कृती म्हणजे महानता! संस्कृती म्हणजे प्रेमाला दोहुन काढलेले दुध! सम अधिक कृती म्हणजे संस्कृती!' सर्वेषाम अविरोधेन ब्रम्हकर्म समारंभे ' असा उच्चार करणारी ती संस्कृती! संस्कृती म्हणजे ब्राम्हमुहुर्तावर केलेले स्नान ! संस्कृती म्हणजे सागर आणि अंबर, प्रकाश आणि कमळ, चित्त आणि चैतन्य! याचाच अर्थ अंतातून अनंताकडे, अंधारातून प्रकाशाकडे,विकलातून सकलाकडे, मलातून  विमलाकडे, चिखलातून कमळाकडे, विरोधातून विकासाकडे,विकारातून विवेकाकडे! पाताळातून स्वर्गाकडे!गोंधळातून व्यवस्थेकडे! आरडाओरडीतून संगीताकडे जाणे म्हणजे संस्कृती!संस्कृती सर्व मानवजातीचा मेळा घेऊन मांगल्याकडे जात असते! संस्कृती म्हणजे शिवत्व! आणि संस्कृती म्हणजे निर्भयता!
भारताच्याच काय तर संपूर्ण जगाच्या नसानसात संस्कृती आहे. कोणत्याही संस्कृतीचं वैभव हे सच्चितनन्द च्या वेशीला भिडणारं असतं. आपण ज्याला कधी कधी विकृती म्हणतो, ती सुद्धा संस्कृतीच आहे! कारण, विकृतीचा सकारात्मक अर्थ हा विशेष कृती असा होतो! There is not like an evil ; its just different ,हे वचन संस्कृतीभेदाची रेषाच पुसून टाकते. कारण, संस्कृती मध्ये फरक पडला कि जो बलवत्तर असतो तो तथाकथित सुसंस्कृत ठरतो! अन जो दुर्बल असतो तो 'असंस्कृत' ठरतो! म्हणूनच , आर्य द्रविडना, इंग्रज भारतीयांना असंस्कृत म्हणायचे; पण त्यांचीही एक संस्कृती असू शकते याचा विसर त्यांना पडला असावा! आदिम काळात माणूस अप्रगत होता!अग्नीच्या शोधापासून त्याने त्यांची संस्कृती विकसित करायला सुरुवात केली!गरज हि शोधाची जननी आहे, हे मानवाला तंतोतंत लागू पडते! मग वैदिक धर्म आला, संस्कृतीचा वटवृक्ष फांद्या , विस्तीर्ण करायला लागलं, मग धर्माचं तत्वज्ञान आले. संस्कृतीच्या सहाय्याने माणूस भावना जोपासत गेला. आणि नित्य शुद्ध - बुद्ध - मुक्त - घनरूप - ब्रह्मस्वरूप अशा परमात्म्याला हि आकार देत गेला. नंतर प्रगत तंत्रज्ञान आल्याने मानवाचे कल्याण होत गेले. जुनी युद्ध संस्कृती आली. आता माणूस चंद्रावर जाऊन आला आहे. आणि मंगळाची स्वप्न पाहतो आहे! पूर्वी ' बाबावाक्याम प्रमाणाम' म्हणणारी विद्यार्थ्यांची संस्कृती पण बदलते आहे! आणि आत्ताचा विद्यार्थी चौकस झाला आहे!
पण जर विचार करा... आदिम काळापासून ही संस्कृतीच प्रगत झाली नसती तर ???
आपण ज्या अवस्थेत आहोत, ती अवस्थाच आपल्याला प्राप्त झाली नसती.कारण, उत्क्रांतीच्या काळात आदिमानवाच्या जगण्याच्या संस्कृतीने 'शोध' या संस्कृतीला जन्म दिला. आणि तीच नसती तर आपली पुढची अवस्थाच विसरा!मुळात संस्कृती म्हणजे काय? जिच्यामुळे आपल्याला जगावंसं वाटतं ती संस्कृती!एक विरोधाभासाचं उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्या समाजात लिंग आणि योनीचा उल्लेख अश्लीलतेने केला जातो, पण; संस्कृतीमुळे त्यानाही शिवलिंग आणि नवरात्रात घटाच्या रुपात पुजल जातं! अहो, छान वातानुकुलीत कारमध्ये बसलेल्यांना वाटतं कि बसमधल्या  लोकांची बस मधली संस्कृती किती गचाळ आहे पण, हे लक्षात घेत येत नाही की, ती पण एक पद्धत आहे, एक संस्कृती आहे. तिकडे वागण्याचे काही नियम आहेत.किंबहुना एक उदात्त संभावना आहे. मुळात मला एका गोष्टीचं स्पष्टीकरण द्यावसं वाटतं कि, हिंदू , इस्लाम, ख्रिस्त , बौद्ध , जैन हे धर्म नव्हेतच, तर एक विचारधारा आहेत. त्यांचा पाया संस्कृती आहे.नंतरच्या काळात प्रत्येकजनानी संस्कृतीच्या या विशाल वटवृक्षाच्या फांद्या कापून घेतल्या आणि माझं काय ते खरं असं सांगायला सुरुवात केली.
धर्म आणि संस्कृती या दोन अविभाज्य गोष्टी आहेत.आणि धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे प्रत्येक क्रिया डोळसपणे करणे. धर्म म्हणजे जगण्याची रीत. रोज स्नान संध्या करणे म्हणजे धर्म असेल तर , अशा धर्माचा उपयोग तो काय?
हल्ली काही नव्या संस्कृतीचा शिरकाव माणसाच्या आयुष्यात झाला आहे. कॉलेज जीवनातील कट्टा संस्कृती,शेजारभाव जपणारी चाळ संस्कृती, पांढरपेशा समाजाची झालर असणारी सोसायटी; ही संस्कृती गुलाबाच्या कळीसारखी प्रेम संस्कृती , नात्यांच्या बंधांची संस्कृती, प्रत्येक प्रदेशाची खाद्य - नृत्य - वेशभूषेची संस्कृती, प्रत्येक कुटुंबाची एक स्वतंत्र संस्कृती , देशाची संस्कृती, एखाद्या भाषेची संस्कृती , विचार आणि फटकार्यांची संस्कृती, अद्वैताची ब्रह्मरूप संस्कृती, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं म्हणणारी संस्कृती,कुंचल्याची संस्कृती, नवनवोन्मेष अशा निसर्गाची संस्कृती , शब्दांची संस्कृती , एका संघाची संस्कृती, तसंच एका संघटनेची संस्कृती,मित्राच्या प्रेमाची संस्कृती, एवढंच काय तर वहीच्या शेवटच्या पानाची ही एक विशिष्ठ संस्कृती असते, आणि या सगळ्या संस्कृतीचा मिलाफ म्हणजे,.... जगण्याची संस्कृती!!!
संस्कृती मानवाला एक शिस्त घालून देते. तिच्यात कर्मकांड किंवा बंधन नाही.तिच्यात समजूतदारपण आहे. आपण तृतीयपंथीयांची संस्कृती समजून घेत नाही, यात आपला दोष की संस्कृतीचा?? आपण केवळ ग्रामीण प्रश्नांना जाऊन चुचकारतो किंवा गोंजारतो , पण त्या प्रश्नांच्या हृदयाला कोणीच का भिडत नाही??
संस्कृती, समाज आणि परंपरा या एकात एक गुंतलेल्या आणि गुंफलेल्या संकल्पना आहेत. त्यांचा गुंता केला तो आपण... सध्याच्या परिस्थितीत असंस्कृतपणाचा पेव वाढलंय. किंबहुना,त्याला परंपरेची झालर लावण्यात येते आहे. यशाच्या गुणवत्तेपेक्षा त्याचा आकार महत्वाचा ठरतोय. या संकल्पना उदात्त आहेत, मगाशी सांगितल्याप्रमाणे सच्चिदानंदाच्या वेशीला भिडणाऱ्या आहेत. चुकीचा अर्थ लावतोय तो आपण.. चल तर 'इंडिया'तला 'यंग भारत' शोधताना संस्कृती विस्मृतीत जाणार नाही याचीही दाखल घेऊया!


-मनिष वाळवेकर
रामनारायण रुईया कॉलेज, मुंबई
निवास - वरळी, मुंबई              www.magazineindia.webs.com 

Thursday, 15 August 2013

शुभारंभ ..

जयोस्तुते ! जयोस्तुते श्री महन्मंगले
शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती त्वां महं
यशोयुता वंदे !

'स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या' या मंगल आणि पवित्र शब्दांनी आजच्या चिरायु होणार्या 'भारता 'च्या स्वातंत्र्यदिनी Magazine World of ugi च्या 'blogs ' ना सुरुवात होते आहे! पारतंत्र्य भोगत पाशात अन ब्रिटीशांच्या शृंखलेत अडकून पडलेल्या 'भारतभूमातेला ' आणि माझ्या सर्व कुटुंबियांना, की ज्यांच्यामुळे या 'भारता'चा पुत्र म्हणून जन्मण्याचे भाग्य मला दिले त्यांच्या चरणी नतमस्तक होत हा प्रकल्प अर्पण करावासा वाटतो!
'भारता'चा स्वातंत्र्यलढा हा अनेक अनाम वीरांचा अन वीरांगना यांचा होता. समाजसुधारक अन 'स्वातंत्र्यवीरां'चा होता. भारत स्वतंत्र होऊन आता सुमारे ६६ वर्षे होत आहेत पण, स्वातंत्र्याला आजही खरी व्याख्या सापडलेलीच नाही. आसेतुहिमाचल वसलेल्या या पवित्र 'भारता'त सौंदर्य, संस्कृती,कला, क्रीडा अशा अनेकांना तोड अथवा कमतरता नाहीच! उलट, अभिमानाने मिरवणाऱ्या 'भारता'ला , त्याच्या लावण्याला कुणाची दृष्ट न लागो असे मानण्यासारखे ! खितपत पडलेली दुष्काळग्रस्त जनता, भ्रष्टाचारात गुदमरणारे जीव , फसव्या शेजारी राष्ट्रांनी सीमेवर मांडलेली भौगार्दी, शासकीय उदासीनता, मूल्यांचे अवमूल्यन, लोकशाही कि पक्षशाही?, काहीशी दिशाहीन तरुणशक्ती यात आश्वासाकताच उरली आहे कारण, विश्वासार्हतेला थारा करण्याचा विचारही आता नामशेष होत चालला आहे!
मागील वर्षी 'नाना पाटेकर' यांचा 'साहेबा परत ये ' हा अग्रलेख वाचला होता. 'नाना' जे बोलले ते कुठेतरी पटले. कारण, 'स्वातंत्र्यदिना'च्या पूर्वसंध्येला पाकिस्तान्यांचे हल्ले होणे, बलात्काराच्या घटना, भ्रष्टाचाराचा गौप्यस्फोट या गोष्टी आता,कदाचित नेहमीच्याच झाल्या आहेत. त्यातल्या त्यात 'शिखर धवन'चे द्विशतक हीच काय ती गोड बातमी...
आज आपले 'ब्लोग्स' सुरु होत आहेत. नव्या तारुण्यनाट्याचा शुभारंभ 'readers डेस्क 'च्या पहिल्या अंकाने झालाच आहे!आता ही त्याची 'नांदी'च आहे! आपल्याच 'भारता'च भला व्हावं आणि त्या सत्कर्मी आम्हा साऱ्यांचे हात लागावे ; सदा सर्वं राष्ट्रं सेवामहे | हे आमचे बोधवाक्य सार्थ व्हावे अशीच इच्छा आज आहे! जनमानसात जाणिवांचा जागर व्हावा, सुख - मज्जा मस्ती - विरह अशा अनेक भावना सोबत घेऊन जबाबदारीचे भानही राहावे! शेवटी, आकाशाच्या अथांग छायेची उंची आम्हास काय कळणार? तरीही या आकाशाची झेप घेणे आम्हास आत्मबलाचा विश्वास देणारे ठरते!
आजच्या या पवित्रदिनी भारताला शांतता , समृद्धी , सद्गती आणि जो जे वांछील तो ते लाहो भारतभूलोक असेच पसायदान पुनच्च मागावेसे वाटते! आपण सारे भारतीय बांधव आमचे blogs दि.०१ सप्टेंबर २०१३ पासून रोज वाचू शकाल. तसेच , आपण देखील blogs लेखन करून आपले blogs आम्हास magazine .unity @ gmail .com वर पाठवू शकाल. आपल्या सदिच्छा अन पाठबळावर 'भारतभूमी'ची सेवा करण्याचे सौभाग्य आमच्या भविष्यात आजन्म राहो हीच सदिच्छा !
धन्यवाद!जय हिंद!

सदा सर्वं राष्ट्रं सेवामहे!

१५ अगस्त २०१३
मुंबई                                                                                                      -  शुभंकर करंडे
                                                                         रामनारायण रुईया कॉलेज , मुंबई










लेखक Magazine World ऑफ़ ugi चे संस्थापक अध्यक्ष आहेत। *